माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी साठी 2024- 25 या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या सर्व कामांचे व निधीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची असून नवीन लोकप्रतिनिधीने एक रुपया निधी न आणता लोकनेते थोरात यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहन मा.जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी केले आहे.

घुलेवाडी गावातील विविध विकास कामांबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सिताराम राऊत यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीवरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सन 2024 25 या आर्थिक वर्षांमध्ये घुलेवाडी मधील विविध विकास कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला होता.
या कामाची प्रशासकीय मान्यता प्रशासकीय मंजुरीचे आदेश क्रमांक जीसकअ/ प्रमा क्रमांक 2/980 /2024–25 दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये घुलेवाडी गावठाण येथील पेव्हिंग ब्लॉक बसवणे ,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, बंदिस्त गटार ,काँक्रिटीकरण रस्ता, ब्लॉक बसवणे, रस्ता डांबरीकरण म्हसोबा नगर मधील विविध विकास कामे ,वीज पुरवठा, रस्ता मजबुतीकरण ,बंदिस्त गटार अशा कामांचा समावेश आहे .या सर्व कामांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा मिळाली आहे आणि त्या निधीतील ही सर्व काम आहेत.

मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक रुपयाचा नवीन निधी न आणता जुन्याच कामांचे उद्घाटन केले आहे. खरे तर नव्याने निधी आणून विकास कामे करायला हवी आहेत. मात्र नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त काही लोकांना हाताशी धरून जाहिरात बाजी करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.
आलेला निधी हा सर्व लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळालेला आहे . याचे श्रेय कुणीही घेऊ नये असे आवाहन करताना याबाबतचे मंजुरीचे पत्र प्रसिद्धीस दिली असून नवीन लोकप्रतिनिधीने याचे उद्घाटन केले आहे या अत्यंत चुकीचे आहे.
याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून यापुढे जुन्या कामांचे उद्घाटन केल्यास संपूर्ण गाव हे एकत्र येऊन त्या कामास विरोध करेल असेही त्यांनी म्हटले आहे.