महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा गुणवत्तापूर्ण केंद्र झाला ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तेच्या होण्यासाठी संगमनेर तालुक्यात विशेष योजना राबवण्यात आली असून आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून तालुक्यातील सात शाळांना 87 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार शिक्षण व्यापार शेती यांसह विकास कामांमध्ये राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखला जातो. शिक्षण ही समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम असल्याने ग्रामीण शिक्षणावर अधिक भर देण्याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी विविध योजना राबवल्या आहेत.
हाच वारसा पुढे नेताना आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सह विविध शाळांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निधी देऊन सुविधा निर्माण करून दिले आहेत. याचबरोबर नव्याने जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजना 2025 26 अंतर्गत तालुक्यातील सात शाळांना प्रत्येकी 12 लाख 50 हजार रुपयांचा निधी दिला आहे.
या निधी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेमगिरी 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेमगिरी, येळोशी 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेगाव खुर्द 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समनापुर 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालदाड 12,50,000, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडमाळ वस्ती, तळेगाव दिघे 12,50,000 या शाळांना सदर निधी मिळाला असून त्यातून शाळा खोल्या इमारतींची कामे केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील शाळांना हा निधी मिळवून दिल्याबद्दल पेमगिरी, येळोशी, समनापुर ,मालदार ,तळेगाव दिघे, पारेगाव खुर्द या गावातील नागरिकांनी आ.सत्यजित तांबे यांची अभिनंदन करून आभार मानले आहे.
- प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तेचे होणे गरजेचे – आमदार सत्यजित तांबे
प्रत्येकाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाचे अत्यंत मोठे योगदान असून प्राथमिक शिक्षण हा पाया आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहे. यासाठी चांगल्या सुविधांसह नवीन तंत्रज्ञानाचा वापरही जिल्हा परिषद शाळेमध्ये केला गेला पाहिजे. यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेंना व प्राथमिक शिक्षणासाठी अधिकचा निधी दिला पाहिजे. भाषा यावर वाद करण्यापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.